Thursday 28 July 2022

श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने भक्ताला मिळणार जीवनदान ! “जय जय स्वामी समर्थ” सोम ते शनि संध्या ८.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

मुंबई २८ जुलै२०२२ : भक्ताने पूर्ण श्रद्धेनेनिर्मळ मनाने स्वामीं पुढे केलेली प्रार्थना वा मागणी कधी पूर्ण झाली नाही असे होत नाहीप्रत्यके अडीअडचणीच्या काळात स्वामी भक्ताला योग्य तो मार्ग दाखवतात आणि सुखरूप संकटातून बाहेर काढतातस्वामी आपल्या भक्तांची कठीण परीक्षा देखील घेतातमालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच घटना घडत आहेतस्वामींनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहेत्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेतत्यांनी अनेक रूपं घेऊन भक्तांची मदत केली आहेजय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या माध्यमातून स्वामीच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग आपण अनुभवतोयकाळ बदलला असला तरी आजही स्वामींच्या कृपेची प्रचिती भक्तांना येतेच आहेमालिकेमध्ये बहिरेशास्त्री नामक गृहस्थाच्या मोठ्या संकटात आले आहेतत्यांच्या मुलाचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्यांना आपल्या मुलाला या मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढायचे आहेत्यांच्या कानावर असं येतं किअक्कलकोट येथे गेलात तर स्वामी समर्थ यांच्या कृपेने आलेलं संकट दूर होईलअक्कलकोट येथे आल्यावर त्यांची भेट अर्थात सुंदराबाई सोबत होतेसुंदराबाई याच गोष्टीचा फायदा घ्यायला बघतात आणि स्वामींपर्यंत पोहचायचे असेल तर मीच तुम्हांला मदत करू शकते असं बहिरेशास्त्री यांना सांगतेपणकाही केल्या त्यांची भेट स्वामींशी होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांना खूप चिंता होऊ लागते... मेघ:श्याम म्हणजे त्यांच्या मुलाकडे अवघा एक महिना आहेअसं काय घडतं कि स्वामी आणि मेघ:श्याम यांची भेट घडून येतेस्वामी त्याची इच्छा पूर्ण करतात आणि तिथूनच त्या दोघांची गट्टी जमते.

आता स्वामी त्याला मृत्यूच्या छायेतुन कसं बाहेर काढणार कसं भक्ताला जीवनदान मिळणार सुंदराबाईला स्वामी कसा धडा शिकवणार बघूया मालिकेच्या येत्या भागांमध्येतेव्हा बघत राहा जय जय स्वामी समर्थ सोम ते शनि संध्या .०० वाआपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment