मुंबई १५ जून, २०१९ : ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. हे व्रत सुवासिनीसाठी अत्यंत महत्वाचे असते, अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून हे व्रत करतात. पण सिद्धीसाठी हे व्रतवैकल्ये,ही पूजा शिवासाठी करणे मोठे आव्हानं असणार आहे. हे व्रत हाच पती सात जन्म मिळावा म्हणून पत्नी करते पण सिद्धीला याच जन्मी तो नवरा नको आहे आणि म्हणूनच ती घरातल्यांना निक्षून सांगते शिवासाठी हे व्रत करणार नाही. पण मग अस काय घडत कि, सिद्धी आत्याबाईनी गावामध्ये आयोजित केलेल्या सामुहिक वट पूजन सोहळ्यामध्ये जाण्यास तयार होते. सिद्धी या सोहळ्यामध्ये जाण्याचे काय कारण असेल ? आत्याबाईचा स्वत:चा राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी रचलेला हा डाव असेल का ? या सोहळ्यामध्ये सिद्धी वडाच्या झाडाचे पूजन करत असताना “मला सात जन्म तर काय एक जन्म देखील असा नवरा नको” असं मागण मागते... पण हेच करताना तिला चक्कर येते, शिवा तिला आधार देण्यासाठी जातो... पण तो असं का करतो ? या मागचे कारण काय असेल ? शिवा आणि सिद्धीच्या वैवाहिक नात्यामध्ये विश्वास, प्रेम, आपुलकीच नाही, तर सिद्धी हे वटपौर्णिमेचे पवित्र व्रतवैकल्ये शिवासाठी पूर्ण करण्यास का तयार झाली ? प्रत्येक क्षणी सिद्धीसमोर येत असलेल्या या परिस्थितीला ती कशी ध्येर्याने सामोरी जाईल, हे बघणे रंजक असणार आहे.
वटपौर्णिमेच्या या पवित्र व्रतानंतर शिवा आणि सिद्धीच्या आयुष्याला कुठली नवी कलाटणी मिळेल... हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर...
No comments:
Post a Comment