Thursday 18 April 2019

लक्ष्मीची आर्वीताई परतणार ! लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेचे ३०० भाग पूर्ण ...

मुंबई १८ एप्रिल२०१९ : लक्ष्मी सदैव मंगलम मालिका लवकरच ३०० भाग पूर्ण करणार आहे. आणि या टप्प्यावर आता मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये सगळ्यांची लाडकी आर्वी म्हणजेच सुरभी हांडे लवकरच परत येणारतिच्या येण्याने लक्ष्मीच्या आयुष्याला कोणते वळण मिळणार... अश्या चर्चा काही महिन्यापासून रंगत होत्यायाविषयी चर्चा होत होत्या... हे सगळ होत असताना एकीकडे मल्हार घरामध्ये कोणती अनोळखी मुलगी इतक्या दिवसांपासून फोन करते आहे हे शोधण्याच्या प्रयत्नात आहे . यावेळेस तो आर्वीचा फोटोदेखील दाखवतो आणि असं कळत की कदाचित ती मुलगी आर्वीचं आहे हे कळल्यावर मल्हार खूप अस्वस्थ होतो जर आर्वी परत आली तर त्याचं आणि लक्ष्मीचं लग्न कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे मल्हार घरच्यांना सांगण्याचा निर्णय घेतो कीत्याला लक्ष्मीसोबत लग्न करायचे आहे. हे सांगत असतानाच आर्वी परत येणार आहे. तेंव्हा नक्की बघा आर्वीच्या अचानक येण्याने लक्ष्मीच्या आयुष्याला कुठले नवे वळण मिळेल. येत्या शनिवारी आर्वीची मालिकेमध्ये एन्ट्री होणार आहे. तेंव्हा नक्की बघा  शनि संध्याकाळी ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
आर्वीच्या परत येण्याने लक्ष्मीच्या आयुष्याला कुठली कलाटणी मिळेल आणि मल्हार कुठला निर्णय घेईल आर्वीच्या मनात नक्की काय आहे तिच्या अचानक गायब होण्यामागे कोणाचा हात होता हे बघणे रंजक असणार आहे ... दुसरीकडे अजिंक्यला देखील एक चांगली बातमी घरच्यांना द्यायची आहे. ही चांगली बातमी काय आहे ?

No comments:

Post a Comment